महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..!

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी : आज जर आपण संपूर्ण भारतामध्ये पाहिले तर बिहार, मध्य प्रदेश उत्तर प्रदेश, यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आलेली असून यामुळे सरकारला प्रशासन चालवण्यास आणि प्रत्येक खेड्यामध्ये प्रशासनाच्या सेवा पुरवण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मदत होते आणि जिल्ह्याचा विकास करण्यासही मदत होते. 1 मे 1960 रोजी 26 जिल्ह्या सोबत मराठी भाषेत महाराष्ट्र राज्य तयार झालं आणि हळूहळू महाराष्ट्र मध्ये नव्याने अनेक जिल्ह्यांची निर्मिती होत गेली. आणि तसेच त्यानंतर तब्बल वीस वर्षांचा कालखंड गेल्यानंतर म्हणजेच ही आणखी दोन दशकांमध्ये महाराष्ट्र मध्ये नवीन दहा जिल्ह्यांची निर्मिती झाली आणि आज मी तिला महाराष्ट्र मध्ये आपल्याला 36 जिल्हे पाहायला मिळतात. आणि 358 तालुके अशाप्रकारे आपल्याला महाराष्ट्र पाहायला मिळतो परंतु आता यामध्ये बदल केला जाणार आहे.

वास्तविकरीत्या महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये एका शेवटच्या गावांमधील नागरिकांना शेतकऱ्यांना जर त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यालयाला काही काम असेल, आणि भेट द्यायची असल्यास त्यांचा संपूर्ण दिवस खर्च करावा लागतो यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर हे सांड होत असते. तसेच जिल्ह्याची कामे करण्यासाठी नागरिकांना तब्बल एक दोन दिवस खर्च करावे लागतात. (महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार )

अशा स्थितीमध्ये संपूर्ण खेड्यापाड्यातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना देखील जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी सोपी व्हावी या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात आणखी 22 नवीन जिल्हे तयार करण्याचे नियोजन आखण्यात आलेले असून या 22 जिल्ह्यांची मागणी प्रशासनाकडे प्रस्तावित करण्यात आलेली आहे. अशी माहिती महाराष्ट्र शासनाने नुकतीच जाहीर केलेली आहे.

आजच्या घडीला सध्या महाराष्ट्र मध्ये 36 जिल्हे आणि नव्याने जे 22 जिल्हे निर्माण होणार आहेत याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. आपण खाली जुने जिल्हे तसेच त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातून नवीन जिल्ह्याची निर्मिती केली जाणार आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे.

आपल्याला महाराष्ट्रातील पहिले 36 जिल्हे तर सर्वांनाच माहित आहे परंतु आपण आता कोणत्या जिल्ह्यातून नवीन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती होणार आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहू. (महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार)

महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार

एक मे 1960 महाराष्ट्राच्या स्थापने वेळी असतात असलेले 26 जिल्हे –

रायगड, ठाणे, रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, जळगाव, यवतमाळ

महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर क्रमाक्रमाने महाराष्ट्र मध्ये नवीन दहा जिल्ह्यांची निर्मिती झाली ते दहा जिल्हे –

  • रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन सिंधुदुर्ग जिल्हा तयार झाला.
  • औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जालना जिल्हा तयार झाला.
  • उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन लातूर जिल्हा तयार झाला.
  • चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन गडचिरोली जिल्हा तयार करण्यात आला.
  • मुंबई चे विभाजन होऊन नवीन मुंबई उपनगर आणि मुंबई शहर अशा दोन नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली.
  • धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन नंदुरबार जिल्हा संपूर्ण आदिवासी समुदायासाठी वेगळा करण्यात आला
  • परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन हिंगोली जिल्हा तयार करण्यात आला.
  • विदर्भामधील भंडारा या जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन गोंदिया हा जिल्हा तयार करण्यात आला.
  • ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा तयार झाला.

आणि आजचे प्रस्तावित 22 जिल्हे –

  • नाशिक जिल्ह्यातून नवीन मालेगाव आणि कळवण हे दोन जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहेत.
  • अहमदनगरचे विभाजन करून नवीन संगमनेर शिर्डी आणि श्रीरामपूर असे नवीन तीन जिल्हे निर्माण होणार आहेत.
  • ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन मीरा-भाईंदर आणि कल्याण असे दोन जिल्हे निर्माण होणार आहेत.
  • पुणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन शिवनेरी हा जिल्हा तयार होणार आहे.
  • रायगड जिल्ह्याचे विभाजन करून नवीन महाड जिल्हा तयार होणार आहे.
  • सातारा जिल्ह्यातून नवीन माणदेश हा जिल्हा तयार होणार आहे.रत्नागिरी मधून नवीन मानगड जिल्हा तयार होणार आहे.
  • बीड जिल्ह्यामधून आंबेजोगाई हा जिल्हा नवीन तयार होणार आहे.
  • लातूर जिल्ह्यातून नवीन उदगीर जिल्हा निर्माण होणार आहे.
  • नांदेड या जिल्ह्यातून नवीन किनवट हा जिल्हा तयार होणार आहे.
  • जळगाव जिल्ह्यातून नवीन भुसावळ हा जिल्हा तयार होणार आहे.
  • बुलढाणा या जिल्ह्यातील नवीन खामगाव हा जिल्हा तयार होणार आहे.
  • अमरावती या जिल्ह्यातून नवीन अचलपूर हा नवीन जिल्हा तयार होणार आहे.
  • यवतमाळ या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पुसद हा जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून नवीन साकोली हा जिल्हा तयार होणार आहे.
  • चंद्रपूर या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन चिमूर हा जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून नवीन अहेरी हा जिल्हा तयार होणार आहे.

महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार FAQ

महाराष्ट्रात नवीन किती जिल्हे आहेत?

एक मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापने वेळी 26 जिल्हे होते आणि त्यानंतर दहा जिल्ह्यांची क्रमाक्रमाने निर्मिती झालेली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील तालुके किती?

मुंबई शहर जिल्ह्यामध्ये एकही तालुक्याचा समावेश होत नाही.

2011 च्या जनगणनेनुसार भारतात एकूण जिल्हे किती?

हजार अकराच्या जनगणनुसार भारतातील एकूण 640 जिल्ह्यांचा समावेश आहे

भारतातील सर्वोत्तम जिल्हा कोणता?

भारतातील सर्वोत्तम जिल्हा कोरबा आहे.

Leave a comment