दरवर्षीपेक्षा कापूस उत्पादनामध्ये 30 टक्के घट, कापसाचे भाव वाढण्याची दाट शक्यता

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Cotton Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण बातमी आम्ही घेऊन आलो आहोत.दरवर्षीच्या प्रमाणापेक्षा यावर्षी पाऊस हा खूपच कमी प्रमाणात पडलेला आहे.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.यावर्षीचा सोयाबीन कापूस यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात घट बघायला मिळत आहे.

 

दरवर्षी कापसाच्या उत्पादनामध्ये नेहमीच वाढ बघायला मिळते.मात्र यावर्षी कापसाच्या उत्पादनामध्ये तब्बल 30 टक्के पर्यंत घट झालेली दिसून येत आहे.ऑगस्टमध्ये पुरेसा पाऊस न पडल्यामुळे राज्यात कापसाचे उत्पादन हे साधारणतः 30% पर्यंत कमी झालेले आहे.यावर्षी मराठवाडा तसेच विदर्भामध्ये सुद्धा कापसाचे पीक दिसून येत नाही.

उत्पादन कमी होण्याचे कारण

एका सर्वेच्या अनुसार परभणी जिल्ह्यातील मंदाकडी नावाच्या ठिकाणची रहिवाशी रमेश राऊत यांनी एका विशिष्ट प्रदेशात आपल्याला किती कापूस पिकवता येऊ शकतो याविषयी माहिती सांगितली त्यांच्या मते जर जमिनीला व्यवस्थित पाणी मिळाले तर त्यातून सरासरी आपल्याला 60% पर्यंत कापूस उत्पादन मिळू शकते.परंतु जमिनीला पाण्याचा पुरेसा पुरवठा झाला नाही तर तेच उत्पादन 30% पेक्षाही कमी ठरू शकते.आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ऑगस्टमध्ये पावसाने शेतकऱ्यांना मोठा झटका दिला आहे.पाऊस पुरेसा न झाल्यामुळे कापसाची झाडे पुरेशा वाढली गेली नाही.कैरीमध्ये परिपक्वताा येण्यापूर्वीच पावसाचे प्रमाण कमी झाले.त्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट बघायला मिळत आहे.

सद्यस्थितीमध्ये पुरेसे पाणी नसल्यामुळे झाडांची पाने खाली घडून पडत आहेत.राज्यातील बऱ्याच भागांमधये कपाशीचे पीक व्यवस्थित वाढलेले नाही.खूप सार्‍या विभागात लाल बोंड आळी ची सुद्धा समस्या बघायला मिळत आहे.पुरेसा पाऊस न झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कपाशी वरती रोग बघायला मिळत आहे.पाण्याच्या कमतरतेमुळे दरवर्षी पेक्षा यावर्षी प्रत्येक भागांमध्ये 30 टक्के उत्पादन कमी झालेले बघायला मिळत आहे.

महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये साखरखेर्डा येथील देविदास पाचल या शेतकऱ्याने सांगितले कीयावर्षी विदर्भ तसेच अमरावती या भागातथोडा ठीकठाक पाऊस झाला आहे.पावसाचे प्रमाणे खूप जास्त किंवा खूप कमीही नाही दरवर्षीच्या प्रमाणापेक्षा पावसाचे प्रमाण हे कमीच बघायला मिळत आहे.यामुळे पिकाची व्यवस्थितरित्या वाढ झालेली नाही.

कापसाच्या दरामध्ये होईल वाढ

यावर्षी राज्यामध्ये जेवढे कापसाचे पीक घेतले जाणार आहेत्याचे प्रमाण हे नेहमीपेक्षा खूपच कमी आहेयावर्षीचे कापसाचे प्रमाण हे 30 ते 40 टक्क्यांपर्यंत आहे.मराठवाड्यामध्ये कापसाच्या झाडांना पुरेसा पाऊस नसल्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट दिसून येत आहे.त्याचप्रमाणे यापेक्षा विदर्भामध्ये पाऊस थोडा ठीक होता त्यामुळे उत्पादनामध्ये तरीसुद्धा घट बघायला मिळत आहे.यावर्षी कर्नाटक मधील विजयपूर चिकमंगळूर आणि धारवाड या ठिकाणाहून मिळत असलेला कापूस त्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगला नसल्यामुळे राज्यातील कापूस गिरण्यांना सुद्धा अडचण निर्माण होत आहे.

 

आपल्या सर्वांनाच माहिती कीे की कापूस हा कपडे बनवण्यासाठी वापरण्यात येतो.दरवर्षीपेक्षा यावर्षी कापसाचे प्रमाण कमी असल्यामुळे काही दिवसांमध्येच बाजारपेठेत कापसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार असे चित्र बघायला मिळत आहे.

कापसाच्या दरामध्ये वाढ होण्याचे कारण

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाची मागणी अजून वाढलेली नसल्यामुळे कापसाला सद्यस्थितीमध्ये खूप कमी भाव मिळत आहे.मात्र दरवर्षीपेक्षा यावर्षी कापसाचे उत्पादन कमी असल्यामुळे कापसाच्या बाजारभावामध्ये वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची देवाण-घेवाण उत्पादनामध्ये सुरू होता कापसाच्या भावामध्ये लवकरच वाढ होईल.साधारणता दिवाळीनंतर कापसाच्या भावामध्ये मोठी वाटते बघायला मिळणार

Leave a comment